Showing posts with label संस्कृती. Show all posts
Showing posts with label संस्कृती. Show all posts

Sunday, September 28, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग १


पवित्रं धार्मिक प्रतिकांची हिंदु समाजातील अवहेलना या विषयावरचा
पुण्यजला गंगा हा लेख मी आधी प्रसिद्ध केला होता. त्याच मालिकेतला हा दुसरा लेख.


कामधेनू, गोमाता अशा प्रतिमांनी गौरविलेल्या गायीला हिंदुधर्मात विश्वाची माता असे स्थान दिलेले आहे. गायीविषयी काही हिंदुधर्मियांच्या भावना इतक्या तीव्रं आहेत की "फार फार वर्षांपूर्वीचे आर्य गायींचे मांस खात होते" असे कोणी म्हंटले जरी की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आता आपले पूर्वज काय खात होते यासंबंधी मला अजिबात माहिती नाही. त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्नं होता. त्यांच्या आहाराचे जाऊ द्या हो, आपला आहार हा आपल्या गायीविषयीच्या मताशी सुसंगत आहेत की नाही हा प्रश्नं आज जास्त महत्वाचा आहे. हिंदू म्हणुन गायीची आपल्याला खरोखर किती माहिती आहे?


गायीच्या दुधाचा आपण चक्कं शाकाहारात समावेश केलेला असल्याने ते कोणाला निषिद्ध तर नाहीच, उलट गायीच्या दुधाला अमृतासमान मानल्याने दूध सर्वांना हवेच असाच आपला समज आहे. गेल्या काही दशकात भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे जिवनमानही सुधारते आहे. त्याप्रमाणे दुधाची मागणीही वाढते आहेच. त्यामुळे या वाढत्या मागणीला पुरवठा करणार्‍या या गायींची (अथवा म्हशींची) काय अवस्था होते हे हिंदू म्हणुन कधी कोणी लक्षात घेतले आहे का?



इतर कुठल्याही सस्तन मादीप्रमाणे गाय व्यायल्यानंतरच दूध देते. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे गायीचे दुधही निसर्गाने तिच्या पाडसाच्या वाढीसाठीच तयार केले आहे. गाय साधारण चार वर्षांची झाल्यावर तिची गर्भधारणा होऊ शकते. गायीचे पाडस आईच्या उदरात नऊ महिने वाढते. म्हणजे साधारण पहिली पाच वर्षे तिला दुध येत नाही. पाडसाच्या जन्मानंतर ती साधारण दहा महिने दुध देते. त्यानंतर तिची पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. गायींची आयुर्मयादा साधारण १२-१३ वर्षाची असते. त्यापैकी शेवटची ३-४ वर्षे तिला गर्भधारणा होत नाही. म्हणजे आयुष्यातल्या सुमारे १५० महिन्यांपैकी फार तर ३०-४० महिने ती दुभती असते.


असे असताना वाढत्या लोकसंख्येला दुधाचा पुरवठा, तो ही मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किमतीत कसा होऊ शकतो त्याचे हे विश्लेषण:



पहिला पायरी:भेसळ


दुधात म्हणजे प्रत्यक्ष अमृतात(!?) पाणि घालणे. इहलोकात अमृत प्यायचं तर ते तितकं शुद्ध कसं असेल बरं?


दुसरी पायरी:पाडसाला गायीपासुन तोडणे






नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर त्या पाडसाला त्याची माय ममतेने दुधही पाजु शकत नाही. कारण गायीच्या मालकाला ते परवडणारे नसते. बरेचदा आईपासून तोडलेले हे वासरू जगु शकत नाही. सुरूवातीला जेव्हा वासरू दुसरं काहीच खाऊ शकत नाही तेव्हा आपण खरवसासाठी चीकही चोरतो. दुध प्यायलाने आपण कोणाची हत्या तर करत नाही हे समाधानही खोटेच ठरते.


तिसरी पायरी:कृत्रिम गर्भधारणा


गायीचे दुध आटुन ती पुन्हा नैसर्गिकपणे गर्भार होण्याची वाट नं बघता दुभत्या गायीवरच गर्भारपण लादणे. म्हणजे पुन्हा नऊ महिने वाट बघायला नको. याचा गायींच्या प्रकृतीवर सहाजिकच परिणाम होऊन त्यांचे आयुर्मान कमी होते.


आदर व्यक्तं करायची ही तर्‍हा चांगली आहे! हे सगळं करताना वरून "वासराला चीक पचत नाही", "वासराला लागतं त्यापेक्षा जास्तं दुध गायींना येत असल्याने दुध काढावंच लागतं" वगैरे खोटे युक्तिवाद स्वार्थातुन किंवा अज्ञानातुन केले जातात. निसर्गाने आईच्या दुधाची निर्मितीच मुळी पिलांसाठी केली असताना वासरांना गायीचं दुध पचणार नाही असं होईल का? तुम्हीच विचार करा.


फॅक्टरी फार्म




पश्चिमी संस्कृतीमधे तर प्राणीमात्रांना तितकाही दर्जा मिळत नाही. मानवाचा जन्मं पृथ्वीवरील इतर प्राण्यांवर कुरघोडी करण्यासाठीच (डॉमिनियन) करण्यासाठी झाला असल्याची बर्‍याच ख्रिश्चनांची श्रद्धा असते. त्यात नफेखोरीची भर पडल्याने तर प्राण्यांचे जीवन असह्यच झाले आहे. प्राण्यांना "कच्चा माल" समजुन त्यापासुन खाद्य पदार्थ म्हणजे "पक्का माल" बनवत असल्याची त्यांची भुमिका असते. त्यामुळे इथे दुग्ध व्यावसायिकांच्या धंद्याला "फॅक्टरी फार्म" असेच नाव आहे.



फॅक्टरी फार्ममधे अमानुषतेच्या पुढच्या पायर्‍या गाठल्या जातात:


चौथी पायरी:गायींच्या genes मधे फेरफार करणे:


उत्पादन वाढवण्यासाठी genes मधे बदल करून संकरित गायी तयार करतात (हे काही प्रमाणात भारतातही होते). त्या संकरित गायी भरपूर दुध देतात. पण त्यामुळे गायींची जेनेटिकल एकात्मता नष्टं होण्याच्या मार्गावर आहे.


पाचवी पायरी:वाढीसाठी हार्मोन्सचा मारा:

गायीची शारिरिक वाढ लवकर व्हावी व तीने लवकर गर्भ धारण करावा म्हणुन हार्मोन्स दिले जातात. (आजकाल मुली लवकर वयात येतात हे आपण ऐकतो. का येणार नाहीत? गायींना दिलेले ते वाढीचे हार्मोन दुधातुन आपल्या मुलींना आपणच पाजतो नं?)


सहावी पायरी:हालचालींवर बंधने:

गायींना हालचाल करायला जागा देत नाहीत. याचे दोन फायदे असतात. एक तर हालचाल नं केल्याने सर्व उर्जा दुध अथवा चरबी बनवण्यात खर्च होते. दुसरे म्हणजे तेव्हढ्याच जागेत जास्तं गायी मावु शकतात.

ह्या सर्व अत्याचारांमुळे त्यांना अर्थातच अनेक असाध्य रोग होतात. पार खंगल्यामुळे तीन ते चार वर्षातच त्यांचा मृत्यु होतो. आजारी गायींवर ऍंटिबायोटिक्सचा प्रचंड मारा करतात. त्यांना दिलेले हार्मोन्स आणि ऍंटिबायोटिक्स मग दुधातही आढळतात.


गायींना या यातना आपण जन्मभर भोगायला लावतो. मग आपल्या पूर्वजांनी यदाकदाचित गायींना मारून खाल्लेही असेल तर त्यात इतके वाईट वाटण्यासारखे काय आहे?


अजुनही तुम्ही हा लेख वाचताय याबद्दल तुमचे आभार.


कोणी काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे. जर तुम्हाला फार विचारच करायचा नसेल, तर हा लेख अर्थातच तुमच्यासाठी नाही. पण आपल्या ताटात पडणारे अन्नं कसे तयार झाले आहे याचा विचार करणे जर तुम्हाला गरजेचे वाटत असेल, किंवा मानवतेच्या किंवा धर्माच्या दृष्टिकोनातुन आपण काही तरी अयोग्य करत आहोत ह्याची जाणिव जर तुम्हाला झाली असेल तर माझ्या पुढच्या लेखाची वाट पहा. आहार, आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातुन चर्चा पुढील लेखात.




छायाचित्रे फार्म सॅंक्चुअरीच्या सौजन्याने.

Saturday, September 27, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग २: आहार

बबनराव: डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. लॅक्टोज घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर:(हसत) छे छे बबनराव, काही तरी काय? अहो मोठ्यांना लॅक्टोजची काही गरज नसते. चांगले जेवत जा भरपूर आणि मी हे टॉनिक देतो ते घ्या काही दिवस.
थोड्या वेळानंतर
संपतराव:डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. दुध घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर: अवश्य!
खरं म्हणजे बबनराव आणि संपतरावांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला होता. (कारण लॅक्टोज हा दुधातला सर्वात प्रमुख घटक आहे.) मग डॉक्टरांनी बबनरावांना वेड्यात काढले पण संपतरावांना मात्रं मान्यता दिली असे का?


कारण "दुध प्या" असे डॉक्टर किंवा आहारतज्ञ जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा दुधातील प्रोटीन आणि मिनरल्स (कॅल्शियम आदी) ही आवश्यक तत्वे तुम्हाला मिळतील ही त्यामागची भावना असते. मात्रं एका गोष्टीकडे डॉक्टर व आहारतज्ञ सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे दुधात जितकी उपायकारक तत्वे असतात त्यापेक्षा जास्त अपायकारक तत्वे असतात.


प्रश्नं: दुध हे खरेच अमृत आहे का?


उत्तर: होय, बैलाच्या वाढीसाठी दुधासारखे दुसरे अमृत नाही.


प्रश्न: आणि माणसासाठी?


उत्तर: हे तुमचे तुम्ही ठरवा.


प्रश्न: दुधात असते तरी काय?


उत्तर:





लॅक्टोज हे साखरेचे एक स्वरूप आहे. चरबी(फॅट)मधे कॉलेस्टरॉल असते. (आहारातुन मिळणारे कोलेस्टरॉल फक्त प्राणिजन्य पदार्थातुनच मिळते. वनस्पतींमधे कॉलेस्टरॉल नसते.)

म्हणजे उपायकारक तत्वे ४%, अपायकारक तत्वे ८% आणि उरलेले पाणी असा सरळ हिशोब आहे. शिवाय गायीला अथवा म्हशीला हार्मोन्स, एंटिबायोटिक दिले असेल तर ते ही.

उपायकारक तत्वांपैकी B12 वगळता सर्व घटक वनस्पतीजन्य पदार्थातून मिळू शकतात. फोर्टिफाईड सिरियल मधुन B12 ही मिळु शकते.

दुधातून मिळालेले कॅल्शियम हाडांसाठी चांगले नसते असे काही तज्ञ मानतात. फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने दिलेला हा लेख वाचा.

http://www.pcrm.org/resources/education/nutrition/nutrition7.html

मग असे असताना आपल्या पुर्वजांनी दुधाची इतकी भलावण का केली असावी? सर्वच परिस्थितीत दुध वाईट असते का? जेव्हा अन्नाची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती आणि शारिरीक श्रम हे जिवनाचा अविभाज्य भाग होते तेव्हा दुध हे आहारतील कमतरता भरून काढू शकत होते. आपल्या सुखवस्तु शहरी रहाणीमानाला मात्रं दुधाची काडीमात्रं आवश्यकता नाही. डायबेटिस, हृदयविकार, लठ्ठ्पणा अस्थिविकार असे रोग सामान्यतः पांढरपेशांनाच झालेले आढळतात त्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे दुध.

अर्थात आपल्या खाण्यापिण्यामधे सामाजिक आणि आर्थिक मुल्येही तितकीच महत्वाची असतात. दुध प्यायचे नाही तर चहा कसा पिणार? गोड काय खाणार असे प्रश्नं आपल्याला आणि इतरांना स्वाभाविकपणे पडणारच. हे प्रश्न सोडवणे आजच्या काळात फारसे कठीण नाही. सोया, तांदुळ, बदाम, हेम्प यापासून बनवलेले दुध -दही बाजारात उपलब्ध आहे.

मानवतेच्या किंवा प्रकृतीच्या दृष्टिकोनातुन तुमच्या ओळखीपैकी कोणी दुध घेत नसेल तर "कसलं हे फॅड?"अशी टिंगल नं करता त्यांना सहकार्य करा.

संदर्भ व अधिक माहिती:

http://www.milkfacts.info/Milk%20Composition/Milk%20Composition%20Page.htm

दुध आणि पर्यावरण पुढील लेखात.

Friday, September 26, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ३: पर्यावरण

"छ्या! काही तरी काय? इतकं चांगलं ताजं, नैसर्गिक दुध प्यायल्यानी पर्यावरणाचा र्‍हास कसा होईल? काय वेडबिड लागलंय का तुला? हे सगळं व्हेगन प्रकरण बंद कर आधी." अशा प्रकारची वाक्ये मला बरेचदा ऐकायला मिळतात.
हा विषयच चक्रावुन टाकणारा आहे. अवांतर गप्पा करताना पाच दहा मिनिटात मांडु शकेन असा हा मुद्दाच नाही. मी स्वतः अशाच प्रकारच्या साशंक दोलायमान मनस्थितीतुन गेलेली असल्यामुळे इतरांना मी समजुन घेऊ शकते, पण समजावु शकत नाही. अर्थात बहुतेकांना समजुनच घ्यायचे नसते हा भाग निराळा.
व्याख्या:(तुम्हाला पटो अथवा नं पटो) दुध हे द्रवरूपी मांस आहे. त्यामुळे यापुढे या लेखात मांस हाच शब्द द्रवरूपी किंवा घनरूपी मांसासाठी वापरणार आहे.
नोव्हेंबर २००६ मधे फुड एंड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/ या अहवालाप्रमाणे मांसासाठी पाळलेल्या प्राण्यांमुळे होणारे प्रदुषण हे वाहनांनी होणार्‍या प्रदुषणापेक्षा जास्त आहे.
आजकालचे तथाकथित पर्यावरणवादी "घरातील विजेचे बल्ब बदला", "सेल फोन चार्जरला लावून ठेवु नका" वगैरे हास्यास्पद उपाय सांगत असतात.
काही थोडा अधिक संयुक्तिक विचार करणारी मंडळी "कार चालवण्याऐवजी मी पायी चालतो/सायकल चालवतो/पब्लिक ट्रांसपोर्ट वापरतो" असे अभिमानाने सांगतात. पण हे सगळं करण्यापेक्षा किंवा करूनही मांस खाणे/पिणे सोडले तर पर्यावरणाचे कितीतरी पटीने संवर्धन होइल.
प्रश्न: खाद्य साखळीमधील मोठे प्राणि छोट्या प्राण्यांना खातात. मग आपण मांस खाल्लं तर काय बिघडलं?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन हे प्रजातींच्या सुदृढ परस्परावलंबनावर(सुप) अवलंबुन असते.
या उलट रोगट परस्परावलंबनामुळे (रोप) संतुलन बिघडत जाते.
सुपचे उदाहरण: वाघाला भुक लागली. त्याने जंगलात फिरून हरणांच्या कळपाचा माग काढला. वाघाची चाहुल लागताच हरणे पळू लागली. एक म्हातारे हरिण मात्रं वेगाने पळू शकत नव्हते. ते हरिण वाघाने पकडले व खाल्ले. हरिणांच्या कळपातील ते दुबळे हरिण नाहिसे झाल्याने कळप अधिक सुदृढ झाला. तिसरीकडे हरणांच्या संख्येला आळा बसल्याने जंगलातील हिरवळ कायम टिकुन राहिली.
इथे वाघ आणि हरिण आपापले नैसर्गिक जिवन जगत आहेत. आपण हरणापेक्षा श्रेष्ठं आहोत अशा भावनेने वाघ जंगलात वावरत नाही. जगण्यासाठी आपण या हरणांवर अवलंबुन आहोत, आजुबाजुच्या हिरवळीचे ते आपल्या खाद्यात रुपांतर करतात हे वाघाला चांगल ठाऊक आहे.
रोपचे उदाहरण: वाघाला सारखी-सारखी शिकार करण्याचा कंटाळा आला. मी इतका सामर्थ्यवान असताना मला या तुच्छं हरणांच्या मागे तडमडायची काय गरज? असा विचार त्याच्या मनात डोकावु लागला. म्हणुन त्याने एक युक्ति केली. झाडे कापून एक कुरण तयार केले. त्या कुरणात हरणे आणून सोडली. हरणे पळून जाऊ नये म्हणून कुरणाला कुंपण घातले. भूक लागली की वाघ चांगले मोठे हरिण मारून खाऊ लागला.
त्यामुळे पुढची प्रजा तयार करण्यासाठी केवळ रोगट हरणेच शिल्लक राहीली. हरणांना विविध प्रकारचा पाला न मिळाल्यामुळे हरणे दुबळी झाली. त्यांचं मांस निकृष्टं चवहीन होत गेलं. पण वाघाला आता शिकार कशी करायची तेही आठवेना, म्हणून त्याने चवीकडे दुर्लक्षच केले. हरणांच्या सततच्या चरण्याने कुरणात फारसे गवत उगवेनासे झाले. मग वाघाने आणखी झाडे कापायला सुरूवात केली. हळुहळु वाघाकडे दहा कुरणे झाली. हरणांचे उरलेले मांस तो इतर वाघांना विकु लागला. आता वाघांना हवे तेव्हा हवे तितके मांस मिळू लागले. त्याचे पाहुन इतर वाघांनीही झाडे कापून कुरणे तयार केली. हरणांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे कुरणांकडे लक्ष ठेवण्यासाठी आता आपल्याला बरीच पिल्ले व्हावी असे वाघांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी चार चार वाघिणींशी लग्नं करायला सुरूवात केली. दुसर्‍या वाघाची आपल्या वाघिणीवर नजरही पडू नये म्हणून वाघिणींवर बुरखा घालण्याची सक्ति करण्यात आली. वाघाची पिल्ले तरणी ताठी झाली तशी त्यांची कुरणे वाढू लागली. जंगल कमी कमी होत गेल्याने जंगलातील इतर प्राणि नामशेष होऊ लागले. काही हजार वर्षांनी अख्ख्या पृथ्वीवर हरिण आणि वाघ हे दोनच प्राणि शिल्लक राहिले. उरलेल्या हरणांना गवत कुठुन आणायचे असा गहन प्रश्नं समस्त व्याघ्र समुदायासमोर उभा राहिला.
तात्पर्य: मी सांगुन काही उपयोग आहे का? कोहमच्या म्हणण्याप्रमाणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुढच्या पिढीला ही खोडच लागणार नाही अशी काळजी घेतली तर ते त्यांच्या हिताचे ठरेल.

Thursday, September 25, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ४: आयुर्वेद

आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. आयुर्वेदात खरोखर याविषयी काय लिहीले आहे हे जाणुन घेण्याची इच्छा होती. भारतात गेले असताना केवळ योगायोगाने औरंगाबाद येथील वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचे नाव कळले. संपर्क साधताच त्यांनी मोठ्या मनाने, सर्वतोपरी प्रयत्नं करून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचा अल्पपरिचय:

शिक्षण: आयुर्वेद विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन व पिएचडि

१९७१-१९९८ मुंबई,नागपुर व नांदेड येथे शासकिय विद्यालयात प्राध्यापक.

१९९८-२००० पोतदार मेडिकल कॉलेजचे डिन
२०००-२००४ डायरेक्टर ऑफ आयुर्वेद, महाराष्ट्र शासन.

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?


उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.


प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात, मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

  • दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
  • बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
  • संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.



क्रमशः

पुढील भागात वरील माहितीचे संदर्भ.
विशेष आभार: वैद्या सौ. चारूस्मिता शहा, अमरावती.

Monday, April 21, 2008

गावो विश्वस्य मातरः भाग ५ आयुर्वेद संदर्भ

गावो विश्वस्य मातरः भाग ४ मधील प्रश्नोत्तरांचे संदर्भ या लेखात दिले आहेत. वैद्यांशी फोनवर बोलताना लिहून व रेकॉर्ड करून घेतलेली माहिती योग्य रितीने संपादित करायला जरा वेळ लागला. मला संस्कृत येत नाही, शिवाय मूळ ग्रंथ हाताशी नव्हते. त्यामुळे जे ऐकले आहे ते बरोबर उतरवले आहेत की नाही ही मोठी शंका होती. या श्लोकांचा अर्थ लावणे, व्याकरण तपासणे, संधी-विग्रह करणे या कामात बहुमोल मदत केल्याबद्दल प्रशांतचे आभार. वैद्य श्री अनंता धर्माधिकारी यांचे पुन्हा एकदा आभार.
संदर्भ क्रं १
आमाभिभूतकोष्ठस्य क्षीरं विषमहेरिव
(अष्टाङ्गहृदय चिकित्सास्थान अध्याय १, श्लोक १९)
[कोष्ठ=कोठा; क्षीर=दूध]

अर्थ
शरीराच्या पचनसंस्थेमधे नं पचलेल्या अन्नाचे कण असतील आणि त्यात दूध टाकलं गेलं तर ते अन्नंही खराब होतं व दूधही खराब होतं. पहिलं खाल्लेलं पूर्ण पचल्याशिवाय दूध प्यायचं नाही हा नियम नेहमी पाळावा.

संदर्भ क्रं २

जीर्णे अष्णीयात्

(चरक विमानस्थान अध्याय १, श्लोक २५/४)
अर्थ
पहिलं अन्नं संपूर्ण पचल्याशिवाय दुसरं अन्नं पोटात टाकायचं नाही.

संदर्भ क्रं ३
प्रातराशे त्वजीर्णेऽपि सामयाशो न दुष्यति

सायमाशेऽर्जीर्णे तु प्रातराशो प्रदुष्यति
(चरक चिकित्सास्थान अध्याय १५, श्लोक २३७,२४१,२४२,२४३)

[प्रातराशे (प्रात: + आशे - सकाळी घेतलेले)

त्वजीर्णेऽपि (तु + अजीर्णे + अपि) --तु= परंतु, अपि=सुद्धा, अजीर्णे= न पचलेले

सायमाशो न(सायम् + अश: + न -- विसर्गाचा ओ होण्याचा नियम इथे लागु होतो)-- सायंकाळचा आहार (घेणे) त्याप्रमाणेच दुसर्‍या ओळीत सायम् आशे अजीर्णे तु प्रात: आशो प्रदुश्यति अशी फोड होईल.]

अर्थ

विशेषतः सकाळी दूध पिताना हा विचार प्रामुख्याने करावा की रात्री खाल्लेलं पूर्ण जिरलं आहे की नाही. एखाद्या वेळी सकाळचं खाल्लेलं अन्नं पचलं नसेल आणि त्यावर चुकून काही खाल्लं किंवा दूध प्यायलं गेलं तर फारसं बिघडत नाही, पण रात्री खाल्लेलं जर पचलं नसेल तर त्यावर सकाळी काही खाल्लं किंवा दूध प्यायलं तर मात्रं ते नक्कीच खराब होतं व त्यामुळे रोग होतात.


संदर्भ क्रं ४
दिवाकर अभितप्ताणां व्यायाम अनिल सेवनात्
वातानुलोमी श्रान्तिघ्नं चक्षुष्यं च अपरान्हिकम्
(सुश्रुत सूत्रस्थान अध्याय ४५, श्लोक ६०,६१)

अर्थ
ज्या गाई दिवसभर सूर्याच्या प्रकाशाने तप्त होतात, भरपूर फिरतात अशा गाईंच दुपारी काढलेले दूध हे अत्यंत आरोग्यकारक असतं आणि ते नेहेमी उकळून घ्यावं


संदर्भ क्रं ५
व्यायाम दीप्ताग्नि वयस्थ बलशालिनां विरोधि अपि न पीडायै:
(अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय ७, श्लोक ४७)
अर्थ
जे तरूण आहेत, नेहेमी व्यायाम करतात, ज्यांची पचनक्रिया (अग्नी) उत्तम आहे अशांच्या प्रकृतीला दूध (पचायला जड असलं तरी) विरोध करत नाही.

Tuesday, February 05, 2008

लोकनृत्य

डोसीडो, स्विंग युवर पार्टनर, लेडिज चेन, एलमॅन लेफ्ट, सर्कल राईट, जिप्सी मेल्ट डाऊन.....

हिवाळ्याच्या दिवसात व्यायाम करण्याचे पर्याय कमी. बाहेर बर्फ पडलेले असताना सायकल चालवणे,चालणे,धावणे जरा जीवावरच येते. जिम एके जिम करूनही कंटाळा येतो.अशा वेळी डान्स करण्याने चार भिंतींच्या आत राहुन व्यायाम आणि करमणुक दोन्ही साधले जाऊ शकते. पण क्लब,पब,रेस्टॉरेंटसमधील धुरकट, कर्कश्शं वातावरण नको वाटत असेल तर लोकनृत्य हा एक चांगला पर्याय आहे.


महाराष्ट्राचा स्वतःचा सामुहिक/लोकनृत्य असा काही प्रकार नाही. कोळीनृत्य, आदिवासी नृत्य असली तरी ती मर्यादितच आहेत. आपल्या इथल्या शास्त्रिय किंवा लोकनर्तकांना सहसा इतर राज्यातल्या नृत्य प्रकारांकडेच वळावे लागते. नवरात्रीच्या निमित्त्याने मराठी तरूण तरूणी हिरीरीने गरब्यात सहभागी होतात ते याच कारणासाठी.

आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरूषांनी एकत्रं येऊन नृत्य करणे हेच खुप झाले. एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्ष नं करता टिपर्‍यांचा वापर होतो. युरोप, रशियामधे विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत. तिथे स्पर्शाचा बाऊ नसल्याने हालचालींमधे मोकळेपणा व वैविध्य असते. तर अशी ही विविध लोकनृत्ये युरोपातुन अमेरिकेत आली हे सांगणे नं लगे.

गावागावात कॉंन्ट्रा डान्स, स्क्वेअर डान्स अशा सारख्या नृत्यांचे आयोजन होते. खेळीमेळीचे वातावरण, लहानापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग व लोकसंगीताचा साज. सोप्या स्टेप्समुळे फार चांगलं नाचता आलंच पाहिजे अशीही अट नाही. सहसा अर्धा तास आधी बेसिक स्टेप शिकवण्याचा क्लास असतो. बरोबर पार्टनर आणलाच पाहिजे किंवा मुलगा-मुलगीच पार्टनर असले पाहिजे असे ही काही नाही.

उदाहरणार्थ कॉन्ट्रा डान्सची ही व्हिडिओ पहा:


Wednesday, December 26, 2007

ख्रिसमस इन द आश्रम

एटमच्या आग्रहाखातर गाण्यांचे शब्द व अधिक माहिती खाली देत आहे.
टॉम प्रसाद राव यांचे ख्रिसमस इन द आश्रम ऐका:





तसेच गेल्या नाताळात बॉयमुंगुसने आमची भरपूर करमणुक केली होती ती व्हिडीओ इथे पहा:



टॉम प्रसाद राव यांची इतर गाणी ऐकण्यासाठी त्यांचे मायस्पेस पान इथे बघा
http://profile.myspace.com/index.cfm?fuseaction=user.viewprofile&friendID=123197801

ख्रिसमस इन द आश्रम:
From the west to the east
They left their homes in search of peace
A transcendental mystic yogi
Took them in, he was kind and holy

California to Bombay
They travelled far to sing and pray
But on the last week of the year
Their songs became a little weird


Chorus

Singing Om Alleluia - Hare Hare Krishna
In Excelsis Deo - Rama Bolo Rama Bolo
Gloria Gloria - Govinda Gopala
Om Noel - Jay Siya Ram
Christmas in the Ashram

The guru must be out of town
There's tinsel in Vishnu's crown
Someone hung a Christmas star
From one of Shiva's extra arms

There's egg nog in the black spice tea
Lotus petals on evergreen
Incense burners green and red
Santa hats on shaven heads

(Repeat Chorus)

They sang Gospels and Upanishads
Psalms and Vedas praising God
Maybe Christ and Krishna are amused
When humans get a little bit confused

(Repeat Chorus)



ट्वेल डेज ऑफ ख्रिसमस:

On the first day of Christmas,
my true love gave to me
A totally insufficient dowry

On the second day of Christmas,
my true love gave to me
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the third day of Christmas,
my true love gave to me
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fourth day of Christmas,
my true love gave to me
Four Hari Krishnas..... (Is that Indian)
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fifth day of Christmas,
my true love gave to me
Five Indian games..... (I want to be the cowboy)
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the sixth day of Christmas,
my true love gave to me
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the seventh day of Christmas,
my true love gave to me
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eighth day of Christmas,
my true love gave to me
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the ninth day of Christmas,
my true love gave to me
Nine telemarketers..... (Good Evenin.. This is Kaalin jones. Are you waanting greater kaalrits)
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the tenth day of Christmas,
my true love gave to me
Ten-minute yoga..... (Think the lotus, feel the lotus, drive the lotus)
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eleventh day of Christmas,
my true love gave to me
Eleven syllable name..... (PEESARAVANMUTHUDBLEEKVAAS)
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the twelfth day of Christmas,
my true love gave to me...
Twelve cricket ball tamperers..... (I was simply correcting the stitching)
Eleven syllable name
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five minutes of fame
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

कठिण शब्दं
सेवन-इलेव्हन वर्कर्स: सेवन इलेव्हन नावाची कॉफी शॉपची एक चेन आहे. बर्‍याच भारतिय लोका शाखांचे मालक आहेत.
लोटस: या नावाची एक लक्झुरी कार आहे.

सर्व प्रताधिकार व श्रेय मुळ कलाकारांचे आहे.
बॉयमुंगुसचे संकेतस्थळ व माय स्पेस पान इथे पहा:
http://www.boymongoose.com/
http://www.myspace.com/boymongoose

Monday, November 12, 2007

व्हेजिटेरियन थॅक्स-गिव्हिंगचे निमंत्रण व मेन्यु

भारतात दिवाळीचे दिवस सरतात, त्याच सुमाराच इथे अमेरिकेत सणासुदीचे दिवस सुरू होतात.

ऑक्टोबरच्या अखेरिस बाळ-गोपाळांचा आवडता हॅलोविन येतो.

त्यानंतर येते थॅंक्स गिव्हिंग आणि अर्थातच मग ख्रिसमस व नविन वर्षाचे स्वागत.

१६२१ साली मे फ्लॉवर या जहाजातुन आलेले यात्रेकरू व इथले स्थानिक रेड इंडियन यांनी मिळुन चांगले पीक आल्याबद्दल मेजवानीचे आयोजन केले.

त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केल्या गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.

आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्रं येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो.

थॅंक्स-गिव्हिंग आणि टर्की हे आज अविभाज्य मानले जात असले तरी मूळ मेजवानीत टर्की अथवा पम्पकिन पाय या दोन्हीचा ही समावेश नव्हता. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बर्‍याच आख्यायिका आहेत.

स्थानिक ट्रॅंगल व्हॅजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन थॅंक्स गिव्हिंगचे आयोजन केले आहे. अर्थातच टर्कींचा बळी नं देता जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

यंदा या मेजवानीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळातो आहे. दुपारचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळचे जास्तीचे सिटींग उघडण्याचा आयोजकांचा प्रयत्नं आहे.

अधिक माहिती, रिझर्वेशन तसेच मेनु बघण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.trianglevegsociety.org/thanksgiving07/index.html

Saturday, September 22, 2007

आधी वंदु आणि नंतर?

दहा दिवस सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे. आरास,प्रसाद,आरत्या, मिरवणुका. दहा दिवस कसे निघुन जातात कळतही नाही. लगेच येते अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण आपल्या भक्तिचे,चैतन्याचे आणि मांगल्याचे सार्वजनिक विसर्जन करतो. आपल्या लाडक्या गणेशाचे पुढे काय होते?
http://www.ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra वरून घेतलेली ही छायाचित्रे:


आक्रमणकार्‍यांनी आपले देव भ्रष्टं केले आहेत मुर्तीभंजन केले आहे हे आपल्याला कदापिही मान्य नाही.

चित्रकार हुसेन आपल्या देवादिकांची उघडी नागडी चित्रे काढतात म्हणजे काय? हा घोर अपमान आहे...

समुद्रातुन जहाजांना जागा करून देणे म्हणजे हिंदु धर्माची अक्षम्य अवहेलना आहे....

आपण आहोत तरी कोण?

Saturday, September 01, 2007

सलमान खान व संजयदत्त यांना झाली की नाही?

सलमान खान व संजयदत्त यांना बद्धकोष्ठं म्हणजे मराठीत कॉन्स्टिपेशन झालं आहे का?

तुरूंगात सतत येणं-जाणं असलेल्या या थोर गुन्हेगारांच्या प्रकृतीबद्दल मला जरा काळजी वाटु लागली आहे. देशवासियांना त्यांच्या दिनचर्येची माहिती क्षणोक्षणी कळवण्याचे सामाजिक कार्य आपले थोर पत्रकार रात्रंदिवस करत आहेत. या दोन गुन्हेगारांनी काय खाल्ले, रात्री झोप लागली की नाही ,भेटायला कोण सगे-सोयरे आले, त्यांनी कोणाशी हास्तांदोलन केले, कोणाला मिठी मारली अशी बहुमुल्य माहिती छापायला आपली लोकहितवादी, समाजाभिमुख व स्वतंत्र बाण्याची माध्यमे तत्पर आहेतच. परंतु या सगळ्या वर्णनात या दोन गुन्हेगारांनी शौचालयाचा वापर केल्याची बातमी काही वाचनात आली नाही (तुरूंगात ती सोय असते का हो?). त्यामुळे जरा काळजी वाटु लागली आहे. माध्यमांनी जनतेच्या उत्सुकतेची दखल घेऊन कृपया खुलासा करावा.

Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Sunday, July 15, 2007

कथा एका - नव्हे दोन लग्नांची

तो: आपल्याला एका लग्नाला जायचे आहे.
ती: कुणाच्या?
तो: जेनी आणि विनोदच्या
ती: आपण मुलाकड्चे का मुलीकडचे?
तो: जेनीची आणि माझी जुनी ओळख आहे. खरं म्हणजे जेनीच्या पहिल्या लग्नालाही गेलो होतो मी. फोटोही काढले होते तेव्हा.
ती: हं....लग्नं अमेरिकन पद्धतीचे आहे की भारतिय? काय घालायचे ते ठरवावे लागेल त्याप्रमाणे.
तो: इथले लग्नं ख्रिश्चनपद्धतीचे आहे. त्यानंतर ते भारतात जाऊन वैदिक विधी करणार आहेत.
ती: अरे वा, छान.
तो: मुलाच्या घरच्यांनी दोघांची पत्रिका जुळवून बघितली आहे. त्यानुसार इथल्या लग्नाचा मुहुर्त काढला आहे म्हणे!
ती: अय्या!! मुहुर्त काढून लावलेले हे पहिलेच ख्रिश्चन लग्न असावे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत!
ती: अरे पण त्या जेनीच्या पहिल्या लग्नाचे काय झाले म्हंटलंस?
तो: काय झालं माहिती नाही. खरं म्हणजे जेनीपेक्षा ल्युसीचा स्वभाव खूप छान होता
ती: आता ही ल्युसी कोण आली मधेच आणि जेनीचा आधीचा नवरा कोण?
तो: जेनीचे पहिले लग्नं ल्युसीशी झाले होते - हे बघ तुला फोटो दाखवतो त्यांचे.... पण तुझा चेहेरा असा गोरामोरा का झाला आहे? बरी आहेस ना?
ती: नाही, काही नाही - पाणी प्यायलं की जरा बरं वाटेल... अं अं ...म्ह म्ह म्हणजे जेरी साईनफिल्ड म्हणतो त्याप्रमाणे "नॉट दॅट देअर इज एनिथिंग रॉंग विथ इट."

Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

Sunday, April 22, 2007

फुलफ्रेम भाग २ - Nomadak Tx

चलापार्टा (इंग्रजी स्पेलिंग Txalaparta) नावाचे एक ताल वाद्यं आहे. दोघांनी मिळून वाजवायचे असते. हजारो वर्षापूर्वी पूर्व युरोपातील बास्क कंट्रीतील आदिवासी लोक दूरसंदेशासाठी या वाद्याचा उपयोग करायचे. मधल्या शतकात चलापार्टा जवळ जवळ अस्तंगत झाले होते. १९५० साली बास्क कंट्रीमधे केवळ २ चलापार्टा उरले होते. त्यानंतर कोणीतरी त्याचे पुनरूज्जीवन करायचे ठरवले. आज चलापार्टा वाजवणारे बरेच वादक तयार झाले आहेत. हरकाईट्झ आणि इगोर हे पंचविशीतले दोन हुन्नरी तरूण त्यातलेच. मूळ्चे आदिवासी वाद्य असल्याने खर्‍याखुर्‍या आदिवासी लोकसंगीतात याचा उपयोग करावा आणि काय होते ते बघावे असा विचार करून हे दोघे तरूण घराबाहेर पडले - आदिवासींच्या शोधात.
पहिला मुक्काम भारत. जिथे जमेल तिथे मैफिल जमवायची. मुंबईतील काही शास्त्रिय संगीत वाजवणार्‍या कलाकारांसमवेत वाजवण्याचा प्रयोग केला. एक कार्यक्रमही दिला.
नंतर गुजरातमधील एक आदिवासी खेडे तिथल्या आदिवासी संगीतात चलापार्टा अगदी चपखल बसते. पारंपारिक प्रथेप्रमाणे हे वाद्य आजूबाजूच्या परिसरात सापडणार्‍या साधनांपासून बनवायचे असते. गुजराथी खेड्यासाठी सागाच्या लाकडापासून चलापार्टा बनवण्यात आला होता.
दुसरा मुक्काम आर्क्टिक सर्कल. स्कॅंडेनेव्हियातील सामी जमात ही युरोपमधील मूळ आदिवासी जमात आहे असे मानले जाते. बहुतेक सामी आता आधुनिक झाले असले तरी काही लोक रेनडियर पालन करून उदर निर्वाह करताहेत. हरकाईट्झ आणि इगोर बर्फातून मार्ग काढत सामींना भेटायला जातात. जरा स्थिरस्थावर होतात, अंघोळी बिंघोळी आटपून लगेच कामाला लागतात.
आधी चलापार्टा बनवायला पाहिजे नाही का? तो ही आजूबाजूच्या परिसरात मिळेल ती सामुग्री घेऊन.
मग सामींबरोबर प्रॅक्टिस सुरू आणि ही बघा कार्यक्रमाची तयारी.

तिसरा मुक्काम मोरोक्को. इथे आफ्रिकेत आदिवासींची कमी नाही. शिवाय इतर भागात चाललेल्या संघर्षांमुळे सुदान, युगांडाचे शरणार्थी आदिवासीही इथे आले आहेत.

या वाळवंटात दगडाचा चलापार्टा बनवायला हवा.


चौथा मुक्काम मंगोलिया. इथले बांबू किंवा तत्सम प्रकारातून चलापार्टा बनला.


टाळ्यांच्या गजरात सिनेमा संपला. थिएटरमधले दिवे लागले - हर्काईट्झ आणि इगोर प्रत्यक्ष चलापर्टा घेऊन हजर होते. एक छोटा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

सिनेमाचे ट्रेलर इथे बघा:
http://www.nomadaktx.com/english/pelicula/principal.html
(शेवटचा फोटो नवर्‍याने काढला आहे. इतर सर्व फोटो नोमॅडक च्या वेबसाईटवरून त्यांच्या परवानगीने घेतले आहेत.)

Wednesday, April 11, 2007

एक प्रदेश फुलांचा आणि कवितांचा

ओळखा पाहू हा देश - गुलाबांचा आणि कवितांचा म्हणून याची ख्याती आहे. इथल्या प्राचिन संस्कृतीचा आणि धर्माचा प्रभाव जगातल्या सर्व प्रमुख संस्कृती आणि धर्मांवर पडला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथल्या विचारवंतांवर साम्यवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पगडा होता. इथल्या पुरोगामी नेत्यांनी १९०७ साली लोकशाहीची स्थापना केली आणि १९२५-२८ या दरम्यान धर्मनिरपेक्षं घटना अंगिकारली. न्यायव्यवस्थेला धर्मगुरूंच्या कचाट्यातून मुक्तं केले. स्त्रीयांना जाचक बंधनातून मुक्तं केले. तर असा हा देश कोणता असेल?
लक्षात येतंय का? विचार करा जरा हवं तर...



लक्षात आलं असेल (किंवा नसेलही) तर उत्तर पहाण्यासाठी खाली जा....




उत्तर आहे इराण! होय इराण! तुमच्या इतकंच मी ही दचकले होते. इराण म्हटलं की डोळ्यासमोर प्रतिमा येते ती दाढीवाल्या, उग्र चेहेर्‍याच्या खोमेनीसारख्या नेत्यांची आणि बुरख्यातल्या बायकांची - किंवा फारच झालं तर नोबेल विजेत्या शिरीन इबादींची. पण ह्या स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन तिथल्या सामान्य माणसांचा परिचय करून दिला तो ओमिद साफि या व्यक्त्यानी. अमेरिका आणि इराणचे युद्ध होण्याची दाट शक्यता असल्याने इथल्या काही शांतीवादी संघटना सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्नं करत आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले होते.
इराणच्या सद्ध्याच्या राजकिय परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्यांची संख्या इथे खूप आहे. अशा परिस्थितीत देश सोडावा लागणार्‍या लोकांकडून तटस्थ मतांची अपेक्षा करणे जरा अतीच होते. शिवाय भारत-इराण, तसेच अमेरिका-इराण सांस्कृतिक संपर्क जवळजवळ अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भारतिय किंवा अमेरिकन लोकांकडून सत्य परिस्थिती कळणे कठीणच. पण त्या दिवशीचे वक्ते मात्रं या विषयातले तज्ञ होते आणि बर्‍यापैकी तटस्थ दृष्टिकोनातून माहिती देत होते.
"मग अशा या पुरोगामी देशाचा आत्यंतिक प्रतिगामीपणाकडे प्रवास कसा झाला? कोणती परिस्थिती आणि कोणते देश याला कारणीभूत आहेत?" वक्ते ओमिद साफि श्रोत्यांशी संवाद साधू लागले.
वर उल्लेखलेली धर्मनिरपेक्ष घटना बहुतांश कागदोपत्रीच राहिली कारण इराण बनला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी. एकीकडे प्रभावशाली शेजारी रशिया आणि दुसरीकडे ब्रिटीश राजवट यांच्यातील रस्सीखेचीत पार भरडला गेला. रशियन साम्यवादाचा पगडा कमी करण्यासाठी इंग्लंडने त्यावेळी अगदी प्रभावहीन असलेल्या उलेमांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
लोकनियुक्त प्रतिनिधी एकीकडे आधुनिकीकरणासाठी झटत असताना ब्रिटीशांच्या मदतीने उलेमांची ताकद वाढत गेली.
या खेळाचा एक महत्वाचा मोहोरा म्हणजे मोहम्मद मोसाद्दिक. शिक्षक,विचारवंत,लेखक असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व. पार्लमेंटचे सदस्य,अर्थमंत्री अशी अनेक पदे सांभाळून १९५१ साली ते पंतप्रधानपदावर निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतीत त्यांनी एकीकडे देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्नं केला, तर दुसरीकडे ब्रिटिश साम्राज्याला थोपवण्याचेही प्रयत्नं केले. त्यावेळी ऍंग्लो ब्रिटिश ऑईल कंपनीत ब्रिटीश सरकारची ५१% भागीदारी होती. परंतू तेलाच्या निर्मितीतून मिळालेला जेमतेम १६% नफा इराणला मिळत होता. शिवाय ब्रिटीश सरकार सतत राजकिय ढवळाढवळ करत असे. मोसाद्दिकांनी तेल व्यवसाय सरकारी नियंत्राणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय अर्थातच ब्रिटीश सरकारला मानवणारा नव्हता. त्यामुळे इराणच्या तेलावर आंतर राष्ट्रीय बंदी घालण्यात आली. ब्रिटीश युद्धनौका इराणच्या आखातात दाखल झाल्या. दुसर्‍या महायुद्धानंतर इस्त्रायलची निर्मीती झाली होती,आणि शीतयुद्धही सुरू झाले होते. या दोन कारणांसाठी अमेरिका या खेळात सामिल झाली.
अखेर १९५३ साली अमेरिका (सी आय ए)आणि इंग्लंड या दोन देशांनी मिळून मोसाद्दिकांना पदच्युत केले. मोसाद्दिक समर्थकांचे अतिशय क्रूरपणे हाल करण्यात आले. अमेरिका आणि इंग्लंडला धार्जिण्या असलेल्या शहांना सत्तेवर बसवण्यात आले. इराणी जनतेला ते पसंत नव्हते. शिवाय शहांच्या राज्यात विरोधकांना हालअपेष्टा,तुरुंगवास व तडीपारीचा सामना करावा लागला. या तडीपार लोकांमधील एक नाव म्हणजे आयातुल्ला खोमेनी. आयातुल्ला काशनी हे खोमेनींच्या क्रांतीची प्रेरणा होते. (ब्रिटीश सरकारने १९४० मधे काशनींना समर्थन दिले होते).
ओमिद साफिंच्या मते खोमेनींची क्रांती ही चुकीच्या मार्गानी गेली आहे आणि फसली आहे, तरी तिची सुरवातीची उद्दीष्टे मात्रं योग्य होती. इराणच्या इस्त्रायल द्वेषाबद्दल साफि म्हणाले की इराणी लोक एकूणच इतर लोकांना सहसा सामावून घेत नाहीत, या बाबतीत सुधारणा होण्याची नक्कीच गरज आहे. पण अशा प्रकारचे पूर्वग्रह जगात सगळीकडे आढळतात.
इराकच्या सद्ध्याच्या परिस्थितीवर ते म्हणाले अमेरिका आलीच मुळी शिया-सुन्नी या शब्दांचा जप करत. समविचारी इराकी लोकांना राजकिय पक्ष स्थापन करायची संधीच मिळाली नाही.
अशी आणि इतर बरीच नवीन माहिती मिळाली. अर्थात साफिंनी एकच बाजू मांडली हे मान्य केले, तरी एकूण अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघितला तर हे वर्णन अगदी सुसंगत वाटते.

इराणच्या जनजिवनाची ही काही चित्रे मला एका मैत्रिणीने पाठवली आहे.













जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सामान्य माणसं सगळी एकाच मातीची बनलेली असतात, त्यांची स्वप्नं एक सारखीच असतात. स्टिरियोटाईप तयार केले की आपले आणि त्यांचे असे भेद तयार होतात...
(Photos are from unknown source. I will be happy to credit if the source is known.)