Showing posts with label आंतरराष्ट्रिय. Show all posts
Showing posts with label आंतरराष्ट्रिय. Show all posts

Tuesday, February 05, 2008

लोकनृत्य

डोसीडो, स्विंग युवर पार्टनर, लेडिज चेन, एलमॅन लेफ्ट, सर्कल राईट, जिप्सी मेल्ट डाऊन.....

हिवाळ्याच्या दिवसात व्यायाम करण्याचे पर्याय कमी. बाहेर बर्फ पडलेले असताना सायकल चालवणे,चालणे,धावणे जरा जीवावरच येते. जिम एके जिम करूनही कंटाळा येतो.अशा वेळी डान्स करण्याने चार भिंतींच्या आत राहुन व्यायाम आणि करमणुक दोन्ही साधले जाऊ शकते. पण क्लब,पब,रेस्टॉरेंटसमधील धुरकट, कर्कश्शं वातावरण नको वाटत असेल तर लोकनृत्य हा एक चांगला पर्याय आहे.


महाराष्ट्राचा स्वतःचा सामुहिक/लोकनृत्य असा काही प्रकार नाही. कोळीनृत्य, आदिवासी नृत्य असली तरी ती मर्यादितच आहेत. आपल्या इथल्या शास्त्रिय किंवा लोकनर्तकांना सहसा इतर राज्यातल्या नृत्य प्रकारांकडेच वळावे लागते. नवरात्रीच्या निमित्त्याने मराठी तरूण तरूणी हिरीरीने गरब्यात सहभागी होतात ते याच कारणासाठी.

आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरूषांनी एकत्रं येऊन नृत्य करणे हेच खुप झाले. एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्ष नं करता टिपर्‍यांचा वापर होतो. युरोप, रशियामधे विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत. तिथे स्पर्शाचा बाऊ नसल्याने हालचालींमधे मोकळेपणा व वैविध्य असते. तर अशी ही विविध लोकनृत्ये युरोपातुन अमेरिकेत आली हे सांगणे नं लगे.

गावागावात कॉंन्ट्रा डान्स, स्क्वेअर डान्स अशा सारख्या नृत्यांचे आयोजन होते. खेळीमेळीचे वातावरण, लहानापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग व लोकसंगीताचा साज. सोप्या स्टेप्समुळे फार चांगलं नाचता आलंच पाहिजे अशीही अट नाही. सहसा अर्धा तास आधी बेसिक स्टेप शिकवण्याचा क्लास असतो. बरोबर पार्टनर आणलाच पाहिजे किंवा मुलगा-मुलगीच पार्टनर असले पाहिजे असे ही काही नाही.

उदाहरणार्थ कॉन्ट्रा डान्सची ही व्हिडिओ पहा:


Wednesday, December 26, 2007

ख्रिसमस इन द आश्रम

एटमच्या आग्रहाखातर गाण्यांचे शब्द व अधिक माहिती खाली देत आहे.
टॉम प्रसाद राव यांचे ख्रिसमस इन द आश्रम ऐका:





तसेच गेल्या नाताळात बॉयमुंगुसने आमची भरपूर करमणुक केली होती ती व्हिडीओ इथे पहा:



टॉम प्रसाद राव यांची इतर गाणी ऐकण्यासाठी त्यांचे मायस्पेस पान इथे बघा
http://profile.myspace.com/index.cfm?fuseaction=user.viewprofile&friendID=123197801

ख्रिसमस इन द आश्रम:
From the west to the east
They left their homes in search of peace
A transcendental mystic yogi
Took them in, he was kind and holy

California to Bombay
They travelled far to sing and pray
But on the last week of the year
Their songs became a little weird


Chorus

Singing Om Alleluia - Hare Hare Krishna
In Excelsis Deo - Rama Bolo Rama Bolo
Gloria Gloria - Govinda Gopala
Om Noel - Jay Siya Ram
Christmas in the Ashram

The guru must be out of town
There's tinsel in Vishnu's crown
Someone hung a Christmas star
From one of Shiva's extra arms

There's egg nog in the black spice tea
Lotus petals on evergreen
Incense burners green and red
Santa hats on shaven heads

(Repeat Chorus)

They sang Gospels and Upanishads
Psalms and Vedas praising God
Maybe Christ and Krishna are amused
When humans get a little bit confused

(Repeat Chorus)



ट्वेल डेज ऑफ ख्रिसमस:

On the first day of Christmas,
my true love gave to me
A totally insufficient dowry

On the second day of Christmas,
my true love gave to me
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the third day of Christmas,
my true love gave to me
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fourth day of Christmas,
my true love gave to me
Four Hari Krishnas..... (Is that Indian)
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fifth day of Christmas,
my true love gave to me
Five Indian games..... (I want to be the cowboy)
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the sixth day of Christmas,
my true love gave to me
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the seventh day of Christmas,
my true love gave to me
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eighth day of Christmas,
my true love gave to me
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the ninth day of Christmas,
my true love gave to me
Nine telemarketers..... (Good Evenin.. This is Kaalin jones. Are you waanting greater kaalrits)
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the tenth day of Christmas,
my true love gave to me
Ten-minute yoga..... (Think the lotus, feel the lotus, drive the lotus)
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eleventh day of Christmas,
my true love gave to me
Eleven syllable name..... (PEESARAVANMUTHUDBLEEKVAAS)
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the twelfth day of Christmas,
my true love gave to me...
Twelve cricket ball tamperers..... (I was simply correcting the stitching)
Eleven syllable name
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five minutes of fame
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

कठिण शब्दं
सेवन-इलेव्हन वर्कर्स: सेवन इलेव्हन नावाची कॉफी शॉपची एक चेन आहे. बर्‍याच भारतिय लोका शाखांचे मालक आहेत.
लोटस: या नावाची एक लक्झुरी कार आहे.

सर्व प्रताधिकार व श्रेय मुळ कलाकारांचे आहे.
बॉयमुंगुसचे संकेतस्थळ व माय स्पेस पान इथे पहा:
http://www.boymongoose.com/
http://www.myspace.com/boymongoose

Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Wednesday, April 11, 2007

एक प्रदेश फुलांचा आणि कवितांचा

ओळखा पाहू हा देश - गुलाबांचा आणि कवितांचा म्हणून याची ख्याती आहे. इथल्या प्राचिन संस्कृतीचा आणि धर्माचा प्रभाव जगातल्या सर्व प्रमुख संस्कृती आणि धर्मांवर पडला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथल्या विचारवंतांवर साम्यवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पगडा होता. इथल्या पुरोगामी नेत्यांनी १९०७ साली लोकशाहीची स्थापना केली आणि १९२५-२८ या दरम्यान धर्मनिरपेक्षं घटना अंगिकारली. न्यायव्यवस्थेला धर्मगुरूंच्या कचाट्यातून मुक्तं केले. स्त्रीयांना जाचक बंधनातून मुक्तं केले. तर असा हा देश कोणता असेल?
लक्षात येतंय का? विचार करा जरा हवं तर...



लक्षात आलं असेल (किंवा नसेलही) तर उत्तर पहाण्यासाठी खाली जा....




उत्तर आहे इराण! होय इराण! तुमच्या इतकंच मी ही दचकले होते. इराण म्हटलं की डोळ्यासमोर प्रतिमा येते ती दाढीवाल्या, उग्र चेहेर्‍याच्या खोमेनीसारख्या नेत्यांची आणि बुरख्यातल्या बायकांची - किंवा फारच झालं तर नोबेल विजेत्या शिरीन इबादींची. पण ह्या स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन तिथल्या सामान्य माणसांचा परिचय करून दिला तो ओमिद साफि या व्यक्त्यानी. अमेरिका आणि इराणचे युद्ध होण्याची दाट शक्यता असल्याने इथल्या काही शांतीवादी संघटना सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्नं करत आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले होते.
इराणच्या सद्ध्याच्या राजकिय परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्यांची संख्या इथे खूप आहे. अशा परिस्थितीत देश सोडावा लागणार्‍या लोकांकडून तटस्थ मतांची अपेक्षा करणे जरा अतीच होते. शिवाय भारत-इराण, तसेच अमेरिका-इराण सांस्कृतिक संपर्क जवळजवळ अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भारतिय किंवा अमेरिकन लोकांकडून सत्य परिस्थिती कळणे कठीणच. पण त्या दिवशीचे वक्ते मात्रं या विषयातले तज्ञ होते आणि बर्‍यापैकी तटस्थ दृष्टिकोनातून माहिती देत होते.
"मग अशा या पुरोगामी देशाचा आत्यंतिक प्रतिगामीपणाकडे प्रवास कसा झाला? कोणती परिस्थिती आणि कोणते देश याला कारणीभूत आहेत?" वक्ते ओमिद साफि श्रोत्यांशी संवाद साधू लागले.
वर उल्लेखलेली धर्मनिरपेक्ष घटना बहुतांश कागदोपत्रीच राहिली कारण इराण बनला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी. एकीकडे प्रभावशाली शेजारी रशिया आणि दुसरीकडे ब्रिटीश राजवट यांच्यातील रस्सीखेचीत पार भरडला गेला. रशियन साम्यवादाचा पगडा कमी करण्यासाठी इंग्लंडने त्यावेळी अगदी प्रभावहीन असलेल्या उलेमांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
लोकनियुक्त प्रतिनिधी एकीकडे आधुनिकीकरणासाठी झटत असताना ब्रिटीशांच्या मदतीने उलेमांची ताकद वाढत गेली.
या खेळाचा एक महत्वाचा मोहोरा म्हणजे मोहम्मद मोसाद्दिक. शिक्षक,विचारवंत,लेखक असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व. पार्लमेंटचे सदस्य,अर्थमंत्री अशी अनेक पदे सांभाळून १९५१ साली ते पंतप्रधानपदावर निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतीत त्यांनी एकीकडे देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्नं केला, तर दुसरीकडे ब्रिटिश साम्राज्याला थोपवण्याचेही प्रयत्नं केले. त्यावेळी ऍंग्लो ब्रिटिश ऑईल कंपनीत ब्रिटीश सरकारची ५१% भागीदारी होती. परंतू तेलाच्या निर्मितीतून मिळालेला जेमतेम १६% नफा इराणला मिळत होता. शिवाय ब्रिटीश सरकार सतत राजकिय ढवळाढवळ करत असे. मोसाद्दिकांनी तेल व्यवसाय सरकारी नियंत्राणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय अर्थातच ब्रिटीश सरकारला मानवणारा नव्हता. त्यामुळे इराणच्या तेलावर आंतर राष्ट्रीय बंदी घालण्यात आली. ब्रिटीश युद्धनौका इराणच्या आखातात दाखल झाल्या. दुसर्‍या महायुद्धानंतर इस्त्रायलची निर्मीती झाली होती,आणि शीतयुद्धही सुरू झाले होते. या दोन कारणांसाठी अमेरिका या खेळात सामिल झाली.
अखेर १९५३ साली अमेरिका (सी आय ए)आणि इंग्लंड या दोन देशांनी मिळून मोसाद्दिकांना पदच्युत केले. मोसाद्दिक समर्थकांचे अतिशय क्रूरपणे हाल करण्यात आले. अमेरिका आणि इंग्लंडला धार्जिण्या असलेल्या शहांना सत्तेवर बसवण्यात आले. इराणी जनतेला ते पसंत नव्हते. शिवाय शहांच्या राज्यात विरोधकांना हालअपेष्टा,तुरुंगवास व तडीपारीचा सामना करावा लागला. या तडीपार लोकांमधील एक नाव म्हणजे आयातुल्ला खोमेनी. आयातुल्ला काशनी हे खोमेनींच्या क्रांतीची प्रेरणा होते. (ब्रिटीश सरकारने १९४० मधे काशनींना समर्थन दिले होते).
ओमिद साफिंच्या मते खोमेनींची क्रांती ही चुकीच्या मार्गानी गेली आहे आणि फसली आहे, तरी तिची सुरवातीची उद्दीष्टे मात्रं योग्य होती. इराणच्या इस्त्रायल द्वेषाबद्दल साफि म्हणाले की इराणी लोक एकूणच इतर लोकांना सहसा सामावून घेत नाहीत, या बाबतीत सुधारणा होण्याची नक्कीच गरज आहे. पण अशा प्रकारचे पूर्वग्रह जगात सगळीकडे आढळतात.
इराकच्या सद्ध्याच्या परिस्थितीवर ते म्हणाले अमेरिका आलीच मुळी शिया-सुन्नी या शब्दांचा जप करत. समविचारी इराकी लोकांना राजकिय पक्ष स्थापन करायची संधीच मिळाली नाही.
अशी आणि इतर बरीच नवीन माहिती मिळाली. अर्थात साफिंनी एकच बाजू मांडली हे मान्य केले, तरी एकूण अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघितला तर हे वर्णन अगदी सुसंगत वाटते.

इराणच्या जनजिवनाची ही काही चित्रे मला एका मैत्रिणीने पाठवली आहे.













जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सामान्य माणसं सगळी एकाच मातीची बनलेली असतात, त्यांची स्वप्नं एक सारखीच असतात. स्टिरियोटाईप तयार केले की आपले आणि त्यांचे असे भेद तयार होतात...
(Photos are from unknown source. I will be happy to credit if the source is known.)